Menu

महार वतनाच्या जमिनीची सध्यस्थिती

सयाजी वाघमारे , अध्यक्ष भीमबाणा संघटना, मुंबई आपल्या देशात प्रदीर्घ काळ मोगलांची राजवट होती. त्यांच्या सैन्यामध्ये मोठ्या संख्येने  महार सैनिक होते. युद्धात आघाडीवर राहून त्यांनी शौर्य गाजवले होते. महार सैनिकांच्या पराक्रमाचा गौरव करण्यासाठी म्हणून  इ.स. १५३० साली बिदरच्या बादशाहाने आणि इ.स. १६१५ साली हैदराबादच्या निजामाने महार सैनिकांना इनाम म्हणून जमिनी कसायला दिल्याचा इतिहास आहे. लढाई …

डॉ. आंबेडकरांचा भावनात्मक एकात्मतेचा  राष्ट्रवादी विचार

विद्या चौरपगार नुकताच पार पडलेला महिला क्रिकेट सामना दोन अर्थाने वैशिष्टपूर्ण व आगळावेगळा ठरला.  पहिले म्हणजे या सामन्यातून स्त्रियांनी क्रिकेट जगताला नवीन ओळख दिली आणि  दुसरे  महत्वाचे वैशिष्ट असे की, या सामन्यातून धर्म, प्रांत,पंथ भाषा, जात हा भेद बाजूला सारत मानवी समूहजीवनातील एकत्वाची व आपलेपणाची भावना प्रकर्षाने जाणवली. मोगा, रोहतक, बोकाखात (आसाम), घुवारा (उत्तर प्रदेश), …

कृत्रिम बुद्धिमत्तेचे मायाजाल युग : सहमतीची हुकूमशाही, ॲरिस्टोक्रसी टू टेक्नोक्रसी

मिलिंद कीर्ती हे पत्रकारिता क्षेत्रात ३० वर्षांपासून कार्यरत असून सध्या ते नागपूर येथील एका दैनिकात वृत्तसंपादक या पदावर काम करतात. त्यांनी लिहिलेला ”सहमतीची हुकूमशाही” हा ग्रंथ “कृत्रिम बुद्धिमत्तेचे मायाजाल युग” या ग्रंथाचा दुसरा खंड आहे. आर्टिफिशियल इंटेलेक्च्यूअल टेक्नॉलॉजीचा समाजावर होणारा परिणाम हा या पुस्तकाचा अभ्यास विषय आहे. हा ग्रंथ समाज आणि संस्कृती, तंत्रज्ञान आणि समाज, …

बातम्या

सुखदेव थोरात यांना ‘महात्मा फुले समता’ पुरस्कार जाहीर अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्यावतीने दिला जाणारा ‘महात्मा फुले समता’ पुरस्कार यावर्षी ज्येष्ठ विचारवंत आणि अर्थतज्ज्ञ पद्मश्री डॉ. सुखदेव थोरात यांना देण्यात आला. महात्मा फुले यांची १३५वी पुण्यतिथी आणि समता दिनानिमित्त शुक्रवार (दि. २८) रोजी पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न झाला. एक लाख रुपये, फुले पगड़ी, मानपत्र, …

मंडलच्या वाटेवरील काटे  

 डॉ. संजय शेंडे, ओबीसी अभ्यासक नागपूर       सध्या महाराष्ट्र आणि देशभरात शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण या विषयावर कधी नव्हे इतकी वेगवेगळी आंदोलनं होत आहेत. मराठा या समूहाची ओबीसींच्या 27% टक्के कोट्यातून आरक्षणाची मागणी करणे,त्यासाठी मराठवाड्यातून जरांगे सारखे आंदोलनकर्ते  प्रायोजित करणे,त्यांना सर्वच प्रसिद्धी माध्यमातून अवाजवी महत्त्व देणे,जनतेचे, मूळ प्रश्नांपासून लक्ष विचलित करणे हे सर्वकाही ठरवून केल्या …

सुखदेव थोरात आणि अमित थोरात- आर्थिक जातीवाद कायम : नुकसान भरपाई व आरक्षणाची गरज

प्रा. सुखदेव थोरात आणि प्रा. अमित थोरात यांचे पुस्तक भारतात अनुसूचित जातींचा मानव विकासाचा स्तर कायमच  कमी राहिला आहे. मानव विकासाचे कोणतेही सूचक मानदंड वापरले तरी, त्यांची दारिद्र्याची पातळी उच्च जातींपेक्षा आणि राष्ट्रीय सरासरीपेक्षा अधिकच आहे. पूर्वाश्रमीचे अस्पृश्य आजही प्रचंड दारिद्र्य, उपासमार, कुपोषण, निरक्षरता, अल्पायुष्य, बेरोजगारी, निकृष्ट निवास व्यवस्था आणि पिण्याच्या पाण्याची, स्वच्छतागृहांची, स्नानगृहांची, वीज …

सुखदेव थोरात – आंतरसमूह विषमता : सध्याही कायम आरक्षण, आर्थिक व शैक्षणिक विकासाची गरज

प्रा. सुखदेव थोरात यांचे पुस्तक हे पुस्तक 1990 च्या दशकाच्या सुरुवातीपासून जात, जमाती, धार्मिक अल्पसंख्याक आणि स्त्रिया यांच्याशी संबंधित आंतर-गट असमानतेच्या प्रश्नांवरील सुखदेव थोरातच्या संशोधनावर आधारित आहे. एका अर्थाने हे पुस्तक सुखदेव थोरात यांच्या जवळजवळ चाळीस वर्षांच्या शैक्षणिक प्रवासाचे प्रतिबिंब आहे. या पुस्तकात जात, जमात, धर्म आणि स्त्रिया यांच्या संदर्भात असलेल्या आंतरगट आर्थिक असमानतेच्या सर्वात …

दलितांना नुकसानभरपाई  कां आवश्यक आहे?

 प्रा. अमित थोरात, JNU न्यू दिल्ली     स्वातंत्र्यानंतर शासनाच्या नोकऱ्या, उच्च शिक्षणसंस्था आणि विधिमंडळात आरक्षण ही धोरणात्मक हस्तक्षेपाची प्रमुख पद्धत राहिली आहे. यामागील मुख्य उद्दिष्ट अस्पृश्यतेची प्रथा आणि त्यातून झालेल्या सामाजिक बहिष्करण, प्रतिनिधित्वाचा अभाव, जातीय गुलामगिरी,  आणि न्याय्य सहभाग नाकारल्याची भरपाई करणे हे आहे. आरक्षणाशिवाय अनुसूचित जातीतील लोक   पात्र  असूनही नोकऱ्या व पदांवर निवड होणे …

बातम्या

राज्यातील हजारो शाळा असुविधांनी ग्रस्त- शिक्षक,वीज, संगणक, इंटरनेट, स्वच्छतागृहांचा अभाव, ‘यूडायस प्लस’ अहवालातील नोंदी राज्यातील २५ हजार ९५८ शाळांमध्ये अध्यापनासाठी संगणक सुविधा, ३० हजार १६६ शाळांमध्ये इंटरनेट सुविधा, ५ हजार ५६७शाळांमध्ये वीजच नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच, ६ हजार ९६४ शाळांमध्ये मुलींचे, १० हजार १८९ शाळांमध्ये मुलांचे कार्यक्षम स्वच्छतागृह नसल्याचेही आकडेवारीवरून दिसून येते. एकीकडे डिजिटल …

महाज्योती इमारतीच्या भूमिपूजनावरून सामाजिक संघटनांचा आक्षेप: धार्मिक ऐवजी वैज्ञानिक दृष्टिकोन जपण्याची मागणी

नागपूर प्रतिनिधी महात्मा जोतीराव फुले यांच्या नावाने स्थापन झालेल्या महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) च्या नवीन इमारतीच्या भूमिपूजन समारंभात वेदोक्त मंत्रोच्चार वापरल्याबद्दल विविध सामाजिक संघटनांनी तीव्र आक्षेप नोंदवला असून, या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. यासंदर्भात सामाजिक संघटनांनी राज्याचे मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, मुंबई, यांना एक निवेदन सादर केले आहे. या निवेदनात …

आदिवासी अधिकारी,शिक्षक व इतरकर्मचाऱ्यांनी समाज सुधारणा गटअंतर्गत ” आदिवासी जनता दरबार “

महिन्याच्या पहिल्या रविवारी ५० टक्के व त्यावरील आदिवासी लोकसंख्या असलेल्या गावात सामाजिक,शैक्षणिक,कौटुंबिक व विविध शासकीय योजना संदर्भात येणाऱ्या अडचणी व त्रुटी पूर्ण करण्यासाठी मार्गदर्शन शिबीर गावात सुरु करावे. या समाजसुधारणा गटाला एक स्वयंसेवी सामाजिक कार्यकर्ता नेमावा जेणेकरून कार्यालयीन कागदपत्राची पूर्तता करण्यासाठी मदत करू शकेल.जल,जंगल,जमीन कृषी,शिक्षण,अर्थ बँकिंग,कौटुंबिक, वैवाहिक बाबतच्या समस्या तसेच अनाथ,अपंग,निराधार व वृद्ध महिला पुरुष …

भारतीय ज्ञान प्रणाली आणि राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२०

डॉ. सुखदेव थोरात विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) विद्यापीठे व महाविद्यालयांमध्ये पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांना काय शिकवावे यासाठी अभ्यासक्रम आराखडा (Curriculum Framework) तयार केला आहे. हा आराखडा राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP) २०२० च्या शिफारशींवर आधारित आहे. एनईपी २०२० मध्ये शाळा व उच्च शिक्षण संस्थांमध्ये विद्यार्थ्यांना ‘भारतीय ज्ञान प्रणाली’ (Indian Knowledge Systems – IKS) शिकवावी, असे सांगितले …