आजकालच्या घडामोडी
नवी दिल्लीः जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय ११ वर्षे विरोध केल्यानंतर केंद्र सरकारने अचानक जाहीर केला असला तरी याचे आम्ही स्वागत करतो, असे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बुधवारी सांगितले. मात्र, ही जनगणना कधी करणार याचा कालावधीही सरकारने जाहीर करावा, अशी मागणी त्यांनी केली. आम्ही देशभरात ‘जातनिहाय जनगणना’ करण्यासाठी मोहीम राबवली. याचा परिणाम समोर आहे. …