Menu

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची भारतातील राज्य समाजवादाची याेजनाः

  1. कृषी ही राज्य उद्याेग असावी
    डाॅ. आंबेडकर यांनी कृषीला इतर उद्याेगांप्रमाणेच राज्याच्या ताब्यात असलेला एक उद्याेग मानले पाहिजे, असे सुचवले.
  2. हक्कांचे संपादन व माेबदला
    सरकारने खासगी व्यक्ती (मालक, भाडेकरू किंवा कर्जदार) यांच्याकडे असलेले सर्व कृषी, विमा आणि औद्याेगिक क्षेत्रातील हक्क संपादन करावे आणि त्या माेबदल्यात त्यांच्या हक्काच्या किमतीएवढ्या मूल्याची डिबेंचर (सरकारी राेख्यांच्या स्वरूपात) भरपाई द्यावी. या मूल्यांकनामध्ये काेणत्याही आपत्कालीन किंमतवाढीचा, संभाव्य किंमतीचा किंवा बळजबरीने घेतल्यामुळे झालेल्या किंमतवाढीचा विचार करू नये.
  3. डिबेंचर संदर्भातील अटी
    डिबेंचरधारकास केव्हा आणि कसा राेख रकमेसाठी दावा करता येईल, हे कायद्यानुसार निश्चित करावे.
    डिबेंचर हस्तांतर करता येणारे व वारसाहक्काने मिळणारे असावे, पण मूळ धारक, त्याचा हस्तांतरणकर्ता किंवा वारस काेणीही त्या जमिनीवर किंवा उद्याेगावर पुन्हा हक्क सांगू शकत नाहीत. डिबेंचरवर व्याज कायद्यानुसार निश्चित दराने देण्यात यावे, राेख रक्कमेत किंवा वस्तू स्वरूपात.
  4. सामूहिक शेतीचा प्रस्ताव
    सरकारने संपादित केलेली जमीन प्रमाणित आकाराच्या शेतांमध्ये विभागावी व ती गावातील कुटुंबगटांनाच पुढील अटींवर
    दिली जावीः
    (i शेत एकत्रितपणे (collective farm) कसायचा
    असेल,
    (ii) शेत शेतीविषयक शासनाच्या नियमांनुसार चालवायचा,
    (iii) सर्व खर्च वजा जाता उरलेले उत्पन्न सर्व कुटुंबांमध्ये ठराविक पद्धतीने वाटून घ्यायचे.
  5. जमीनमालकी नष्ट करणे
    जमीन काेणत्याही जात किंवा धर्म न पाहता गावक-यांना दिली जावी आणि अशी व्यवस्था निर्माण व्हावी की जिथे काेणताही जमीनदार, भाडेकरू किंवा भूमिहीन कामगार उरू नये.
  6. राज्य पुरवठा सेवा
    राज्याने सामूहिक शेतकीला आवश्यक पाणी, बैल, औजारे, खत, बियाणे वगैरे पुरवावे.
    आंबेडकरांचा राजकीय व आर्थिक लाेकशाहीवर भर
    आंबेडकर यांचा ठाम विश्वास हाेता की राजकीय लाेकशाही (मतदानाचा हक्क, मूलभूत अधिकार इ.) हे अपुरे आहे.
    त्याशिवाय आर्थिक लाेकशाही आवश्यक आहे. त्यांनी ‘एक माणूस, एक मूल्य‘ हे तत्व सर्वच क्षेत्रात (राजकीय, सामाजिक, आर्थिक) लागू व्हावे, यासाठी संविधानिक सुधारणा मागितल्या. 1931 मधील गाेलमेज परिषदेत त्यांनी स्पष्टपणे सांगितलेः
    ‘आमचा हेतू म्हणजे सर्व प्रकारच्या एकाधिकारांचा नाश करून खरी लाेकशाही प्रस्थापित करणे.‘
    त्यांच्या आयुष्यातील शेवटी त्यांनी बाैद्ध धर्म स्वीकारला. त्याआधी 1956 मध्ये बीबीसीवर भाषण करताना ते म्हणाले की, ‘मार्क्सवाद हे रक्तरंजित क्रांतीतून बदल घडवताे, तर बुद्धधर्म हा रक्तहीन क्रांती घडवताे.‘
    त्यांनी बुद्ध आणि मार्क्समधील साम्य दाखवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्यासाठी मुख्य फरक म्हणजे मार्क्सवाद परकीय
    व हिंसक हाेता, तर बुद्धधर्म नैतिक आणि शांतीप्रिय.

महान तत्त्वज्ञांचे धर्मनिरपेक्षतेवरील विचार
जाॅन लाॅक – चर्च आणि राज्य वेगळे असावेत; धर्म ही वैयक्तिक बाब असावी, राज्याने श्रद्धा लादू नये.
व्हाेल्टेअर – धर्मस्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे समर्थन; धार्मिक असहिष्णुतेचा विराेध.
थाॅमस जेफरसन ‘चर्च व राज्य यांच्यामध्ये भिंत‘ असावी असे प्रतिपादन.
इमॅन्युएल कान्ट – सार्वजनिक जीवनात धार्मिक अंधश्रद्धेपेक्षा विवेकबुद्धी व स्वायत्ततेवर भर.
कार्ल मार्क्स – धर्म हि अफू‘ आहे; खरी मुक्तता धर्मनिरपेक्ष शासनातूनच मिळते.
जाॅन स्टुअर्ट मिल – विचार व श्रद्धेच्या स्वातंत्र्याचे समर्थन, जे धर्मनिरपेक्ष समाजासाठी आवश्यक.
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर – भारतीय लाेकशाही, स्वातंत्र्य, समानता व बंधुता यांवर आधारलेली असावी
आणि राज्याने धर्माबाबत पूर्णपणे तटस्थ राहावे, असे त्यांनी ठाम सांगितले.
थाेडक्यात : धर्मनिरपेक्षता = विवेकस्वातंत्र्य, सर्व धर्मांची समानता आणि धर्माबाबत राज्याची तटस्थ भूमिका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *