Menu

नवीन शैक्षणिक धोरण बहुजनांच्या गळ्याला फास

येत्या निवडणुकीत प्रत्येक नागरिकाच्या जगण्या- मरणाचा प्रश्नाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. शिक्षण, राेजगार, आराेग्य, वाढती महागाई त्यामुळे जनसामान्याचे माेडलेले कंबरडे याची चिंता सत्ताधा-यांनी व जे सत्तेवर निवडून येतील अश्या सर्वांची नैतिक जबाबदारी आहे. हि जबाबदारी ते नाकारीत असतील त्यांचे मनसुबे फक्त भांडवलदारांचे कर्ज माफ करणे, त्यांना विशिष्ट
साेयीसवलती पुरविणे व जनसामान्याचे शाेषण करून संविधानाने दिलेल्या जगण्याचा अधिकार व स्वातंत्र्य पायदळी तुडवीणे असे असेल तर जनतेने अशा व्यक्ती किंवा पक्षाला आपले अमुल्य मत देऊन स्वतःच व आपल्या पिढ्यांचे भविष्य बर्बाद करून आपल्याच लेकरांच्या भविष्याशी खेळ करू नये. त्यासाठी सर्व बहुजनांनी संघटीत हाेऊन सत्ताधारी व शासनकर्ती जमात हाेण्यासाठी कंबर कसली पाहिजे. त्यासाठी खालील बाबींकडे लक्ष दिले पाहिजे.

  1. सर्वांसाठी शिक्षण व आराेग्य यासारख्या मुलभूत सुविधांचे राष्ट्रीयीकरण झाले पाहिजे
  2. शेतीचे राष्ट्रीयीकरण झाले पाहिजे
  3. जातनिहाय जनगणना झाली पाहिजे
  4. शेतक-यांना बिनव्याजी पतपुरवठा केला पाहिजे
  5. खते, बियाणे व शेतीची अवजारे व इतर संसाधने ऋण मुक्त झाले पाहिजे
  6. काळ्याधनावर सरकारने श्वेत पत्रिका जारीकरून काळे धन भारतात आणावे
  7. EVM बँन करून निवडणुका मतपत्रिकेव्दारे घेतले पाहिजे
  8. वीज, पाणी, घर हे नागरिकांचा मुलभूत हक्क मानून सर्वांना परवडेल अशा मा\क दरात उपलब्ध करावेत
  9. प्रत्येक गावातील विकास कामे ग्रामसभेच्या परवानगीने व्हावीत आणि गाव स्वयंपूर्ण करावे
  10. सर्व शेतकरी विराेधी कायदे रद्द झाले पाहिजे
  11. कामाचा कालावधी फक्त 8 तास असला पाहिजे
  12. शेतक-याच्या मालाला हमीभाव मिळालाच पाहिजे
  13. गाव तिथे शाळा असलीच पाहिजे
  14. नवीन शैक्षणिक धाेरण रद्द करून जनसामान्याच्या हिताचे सर्व गाेरगरीब, वंचित, शाेषित, पिडीत यांना दर्जेदार शिक्षण मिळालेच पाहिजे
  15. महिलांना 50 % उमेदवारी प्रत्येक पक्षाने दिली पाहिजे
  16. बेराेजगारांना शासकीय व खाजगी क्षेत्रात नाैकरी मिळाली पाहिजे व कंत्राटीकरण पूर्णतः बंद केले पाहिजे
  17. लाडकी बहिण सारख्या याेजना ऐन निवडणुकीच्या ताेंडावर घाेषित करून जनतेच्या पैश्याची अवास्तव लुट थांबविली पाहिजे. व बहिणींसाठी शाेशत विकासाचा याेजना राबविल्या पाहिजे
  18. अवाजवी सिमेंटीकरण करून पर्यावरणाचे प्रदूषण वाढवू नये व जीवसृष्टीचे संरक्षण करण्यासाठी उपाययाेजना केल्या पाहिजे जाे पक्ष लाेकशाही सुदृढ करेल व सार्वजनिक उद्याेगांचे खाजगीकरण करणार नाही, गरीब बेराेजगारांच्या हाताला काम मिळवून देईल, तसेच लाेकशाहीचा चाैथा स्तंभ माध्यमे व सरकारी यंत्रणा यांचा दुरुपयाेग करणार नाही. महागाईवर नियंत्रण करेल. अशा पक्षाला मत दिले पाहिजे.

ॲड. सुषमा भड
अध्यक्ष: राष्ट्रीय ओबीसी महिला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *